Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: दिलीप कजगांवकर
तंत्रज्ञान क्षेत्रातील चार दशकांचा अनुभव आणि साहित्यविश्वातील संवेदनशील लेखन यांचा सुरेख संगम. शिक्षणाने बी.ई., एम.बी.ए. आणि कॉस्ट अकाऊंटंट असलेले दिलीप कजगांवकर हे सर्टिफाइड प्रोजेक्ट मॅनेजर, सर्टिफाइड क्वालिटी मॅनेजर आणि सिक्स सिग्मा ब्लॅक बेल्ट आहेत. इंजिनिअरिंग व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रात त्यांना सुमारे 40 वर्षांचा समृद्ध व्यावसायिक अनुभव आहे. ग्रीव्ह्ज, महाराष्ट्र स्कूटर्स, पथेजा ग्रुप, झेन्सार, हेक्सावेअर, कॅपजेमिनी, इन्फ्रासॉफ्ट व टेस्टिंगएक्स्पर्ट यासारख्या नावाजलेल्या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. लेखन, कथाकथन आणि कवितेची त्यांना विशेष आवड आहे. 2012 साली प्रकाशित झालेला “वाचावेसे” हा त्यांचा काव्यसंग्रह रसिक वाचकांच्या विशेष पसंतीस उतरला. त्यांच्या कथा आणि कविता विविध वृत्तपत्रे आणि मासिकांत नियमितपणे प्रसिद्ध होत असतात. त्यांच्या लेखनात माणूस, नातेसंबंध आणि जीवनातील सूक्ष्म भावविश्व यांचे प्रामाणिक दर्शन घडते. गेली अनेक वर्षे विविध दिवाळी अंकांत त्यांच्या कथा प्रकाशित होत आहेत. तसेच, गेली दोन वर्षे दर मंगळवारी व शुक्रवारी “विश्वास रेडिओ” (नाशिक) तसेच आकाशवाणी पुणे आणि जळगाव येथून त्यांच्या कथा प्रसारित होत आहेत. विविध संस्थांकडून त्यांना “महाराष्ट्र भूषण”, “साहित्य रत्न” यासारख्या मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ते विविध कार्यक्रमांत 30 मिनिटांपासून 2 तासांपर्यंत आपल्या कथांचे प्रभावी कथाकथन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात. त्यांनी स्वतः कथन केलेल्या तसेच दत्ता सरदेशमुख, सचिन दातार, मुकुंद जोशी, डॉ. सुचिता पाटील, डॉ. जयश्री अय्यंगार, विनया देशपांडे आणि अर्चना कापरे यांसारख्या दिग्गजांनी सादर केलेल्या त्यांच्या अनेक कथा युट्यूबवर उपलब्ध आहेत. आपल्या साहित्यिक प्रवासात दादर येथील जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूशनचे माजी संचालक, डोंबिवली स्थित आदरणीय व्ही. एस. वाणी सर यांच्या लाभलेल्या मौल्यवान मार्गदर्शनाचा ते आवर्जून उल्लेख करतात.
दहावीचे उत्तम वर्गशिक्षक असा लौकिक असणाऱ्या सदानंद माने सरांचा आज निवृत्तीचा दिवस. आजच्या या कार्यक्रमाला सरांच्या पहिल्या बॅचच्या, म्हणजेच 20 वर्षांपूर्वीच्या विद्यार्थ्यांना खास निमंत्रण देण्यात आले होते आणि याच बॅचच्या विद्यार्थ्यांपैकी एका धनवंत विद्यार्थ्याने सरांसाठी एक लाख रुपयांची गुरुदक्षिणा पाठविली होती, स्वतःच्या नावाचा उल्लेख न करता! आपल्या भाषणात सरांनी दोन गोष्टींची खंत बोलून दाखविली. पहिली खंत म्हणजे, सरांच्या गेल्या 20 वर्षांच्या कार्यकाळात त्यांना आलेले एकमेव अपयश म्हणजे त्यांच्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी 10वी पास झाला नव्हता. तो विद्यार्थी हुशार होता, परंतु त्याचे अभ्यासात लक्ष नव्हते. सरांनी वारंवार सांगूनही त्याने सरांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. परिणाम व्हायचा तोच झाला… तो विद्यार्थी…
पाहिजे ‘एम्प्लॉयी कोऑर्डिनेटर (फीमेल)’ अशा एका कंपनीने दिलेल्या जाहिरातीला खूप छान प्रतिसाद मिळाला. बऱ्याच मुलींनी ॲप्लिकेशन केले. कंपनीने शॉर्टलिस्ट करून दहा मुलींना इंटरव्ह्यूला बोलावले. शनिवार म्हणजे तसा सुट्टीचा दिवस. कंपनीने शहराच्या मध्यवर्ती भागातून एका वातानुकूलित मिनीबसची व्यवस्था केली. “ही बस खास तुमच्यासाठी,” म्हणत गणवेशधारी ड्रायव्हरने सर्व मुलींचे गुलाबाचे फूल देऊन स्वागत केले आणि प्रत्येकीला तिच्या नावाचे कार्ड देऊन कोणत्या सीट नंबरवर बसायचे ते सांगितले. बस निघाली आणि लगेचच ड्रायव्हरने बस थांबवून एका अतिशय साधे कपडे घातलेल्या तरुणाला बसमध्ये घेतले. “हा कोण? कशासाठी येतोय? या इंटरव्ह्यू स्पेशल मुलींच्या बसमध्ये याला का घेतले?” असे प्रश्न अनेक जणींनी विचारले. “यांना मी ओळखतो, खूप…
अधिक मासानिमित्त घसघशीत वाण मिळण्याची शक्यता असलेल्या असंख्य भाग्यवान जावईबापूंची मनस्वी क्षमा मागून…
“सर, तुम्ही कसे आहात? मी तुमचा विद्यार्थी राज बोलतोय, ओळखलंत ना मला?” “राज अरे, मी बाई बोलतेय. सरांचा नुकताच डोळा लागलाय, प्रवासाने थोडे थकलेत रे ते… राज म्हणजे तू जोगेश्वरी मंदिराच्या समोर राहायचास, बरोबर ना?” बाईंनी विचारले. “हो बाई… आणि इतके सर्व आठवतेय तुम्हाला?” राजने आश्चर्याने विचारले. “खूप कष्ट करून शिक्षण घेतलेस रे तू. मला आठवतेय ना. स्टेशनवर ओझी वहायचास तू, पण शिकण्याची मोठी जिद्द होती. बरा आहेस ना? काय करतोस तू?” बाईंनी मोठ्या कुतूहलाने विचारले. “बाई, अजूनही मी ओझीच वाहतो, परंतु खांद्यावर नाही तर गाडीतून. माझा ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे,” राजने सांगितले. “बाई, तुमच्या आवाजात मला काळजी दिसते. सर्व ठीक…
संध्याकाळचा फेरफटका मारून गोपाळराव घरी परतले. ते घरात शिरताच सावित्रीबाईंची तुफान एक्सप्रेस सुरू झाली… आजचा विषय गंभीर होता… “थोड्या वेळापूर्वी वकील साहेब घरी आले होते. त्यांनी हे ॲप्लिकेशन दिले आहे आणि हे ॲप्लिकेशन कलेक्टर ऑफिसमध्ये सबमिट करण्याची उद्या शेवटची मुदत आहे. ॲप्लिकेशन सबमिट करताना आपल्याला चार डॉक्युमेंट्सचे ओरिजिनल दाखवावे लागतील आणि कलेक्टर ऑफिसमध्ये रोज फक्त दहा लोकांनाच अपॉइंटमेंट मिळते. म्हणजेच थोडक्यात, उद्यालाच तुम्हाला कलेक्टर ऑफिसमध्ये आणि तेही लवकर जावे लागेल.” “सावित्री, आपल्याकडे फक्त दोनच डॉक्युमेंट्स आहेत, त्यामुळे माझा कलेक्टर ऑफिसला जाऊन काहीच उपयोग होणार नाही.” “अहो, जाऊन तर बघा. कधी कधी कामं होऊन जातात, प्रयत्न करायला काय हरकत आहे?” “ठीक…
सदानंद आणि सावित्रीबाई पुण्यातील त्यांच्या प्रशस्त बंगल्यात राहत होते. एकेकाळी राज आणि वरदच्या धावपळीने गजबजलेला तो बंगला आता शांततेच्या सावलीत उभा होता. भिंतींवरची छायाचित्रे अजूनही स्मृती जागृत करत होती — शाळेतील बक्षिसे, वाढदिवस, कौटुंबिक सहली आणि मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी घेतलेल्या कष्टांची आणि त्यागाची. सदानंद एका खासगी कंपनीतून निवृत्त झाले होते, त्यामुळे पेन्शन नव्हतं. नियमित उत्पन्नाचा कोणताही स्रोत नव्हता. घराची रचना अशी होती की, त्यातील कोणताही भाग वेगळा करून भाड्याने देता येत नव्हता. मोठा मुलगा राज आणि सून नेहा दिल्लीत राहात होते. धाकटा मुलगा वरद आणि रीना नागपूरमध्ये स्थायिक झाले होते. दोन्ही मुलं आई-वडिलांना दरमहा पैसे पाठवत होते. हल्ली त्या पैशांसोबत…
संध्याकाळच्या निवांत वेळी आबा नेहमीप्रमाणे फिरायला गेले असताना अचानक खाली कोसळणार, तोच समोरून येणाऱ्या गृहस्थाने त्यांना धरले… “आबा, ओळखलंस का मला? मी वरद. अरे, दोन-तीन महिन्यांपूर्वी तू असेच चक्कर येऊन पडत होतास, तेव्हा मीच नाही का तुला सावरले आणि वृद्धाश्रमात सोडले. चल, आजही सोडतो मी वृद्धाश्रमात. चक्कर येते तर असा एकटा फिरायला येत जाऊ नकोस,” वरद म्हणाला. “अरे, आता मुलाकडे राहतो, त्यामुळे चक्कर येणे बंद झाले. आज केळीच्या सालीवरून पाय घसरला.” “वा छान! मुलाला सद्बुद्धी झाली. त्याने बापाला वृद्धाश्रमातून घरी आणले,” वरद म्हणाला… “बरं, आता कुठे राहतोस? कुठे सोडू मी तुला?” घरी पोहोचताच आबांच्या नातीने विचारले, “आजोबा, हे कोण?” “रीनू…
सुटीचा दिवस असल्यामुळे राज अगदी आरामात गरमागरम चहाबरोबर बिस्किटांचा आस्वाद घेत पेपर वाचत बसला होता. “एक दिवसाचा कार्यक्रम, खास पुणेकरांसाठी” या जाहिरातीने राजचे लक्ष वेधून घेतले. वातानुकूलित सभागृह, प्रख्यात प्रशिक्षक, चहा, नाश्ता, दुपारचे जेवण, दुपारचा चहा… कार्यक्रमाचे हजेरी बक्षीस 1100 रुपये…! राजने जाहिरातीत दिलेल्या नंबरवर संपर्क साधला आणि त्यांना सांगितले, “तुमच्याकडून जाहिरात देताना मोठी चूक झाली आहे. कार्यक्रमाची हजेरी ‘फी’ लिहिण्याऐवजी तुम्ही हजेरी ‘बक्षीस’ लिहिले आहे.” “नाही सर, ते बरोबर आहे… कार्यक्रम अटेंड करणाऱ्या प्रत्येकाला आम्ही 1100 रुपये बक्षीस देणार आहोत,” पलीकडून अती मधुर आवाजात राजला सांगण्यात आले. “ही फिरकी तर नाही ना?” राजने मनातली शंका बोलून दाखविली. “नाही हो…
उत्तरार्ध दुसऱ्या दिवशी दुपारी मुलाशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे म्हणून सदानंद हॉलमध्ये बसले होते. आज त्यांचा वाढदिवस होता, हे मुलाच्या नक्की लक्षात असेल, त्यांना खात्री होती. “तुम्ही स्वतःहून सांगू नका,” असे सावित्रीबाईंनी त्यांना सकाळीच बजावले होते. रीना राजच्या फोनशी खेळत होती. “आजोबा, हा फोन तुमच्याकडे ठेवा, मी आलेच,” असे म्हणत ती बाल्कनीत गेली. तेवढ्यात राज बाहेर आला आणि त्याने सदानंदांकडून फोन घेतला. फोनवर दोन मिस कॉल होते, राजच्या बॉसचे. “फोन का वाजला नाही?” राजने नीट पाहिले आणि त्याच्या लक्षात आले की फोन म्यूटवर होता… “काय केले बाबा तुम्ही? माझी नोकरी घालवायची का तुम्हाला? अहो, तुमच्यामुळे माझे दोन महत्त्वाचे कॉल मिस झाले.”…
पूर्वार्ध सदानंदांनी मुलगा राजच्या दरवाज्यावरची बेल वाजवली, त्यावेळी रात्रीचे साडेनऊ वाजले होते. सदानंद आणि सावित्रीबाई सांगलीजवळील एका छोट्याशा गावात राहत होते. सहा-सात तासांचा एसटीचा प्रवास करून पुण्याला आल्यामुळे ते दोघेही खूप थकले होते. “कोण पाहिजे तुम्हाला?” स्लीवलेस टी-शर्ट आणि शॉर्ट पॅन्ट घातलेल्या तरुणीने दरवाजा किंचितसा उघडून विचारले. “सूनबाई, तू ओळखलं नाहीस का आम्हाला?” “मी आणि सूनबाई? अहो, अविवाहित आहे मी.” “कोण तुम्ही? कोणाकडे जायचं तुम्हाला?” त्या तरुणीने त्रासलेल्या स्वरात विचारले. “माफ करा, हे बंडूचेच घर आहे ना?” खात्री करून घेण्यासाठी सदानंदांनी विचारले. “नाही, नाही येथे बंडू वगैरे कोणी राहत नाही,” असे म्हणताना त्या तरुणीने दरवाजा पूर्णपणे उघडला. ती सदानंद आणि…

