साहित्य
- जुने बासमती अगर बारीक लांब तांदूळ – चार वाट्या
- फरसबी – पाव वाटी तुकडे
- गाजर – पाव वाटी तुकडे
- फ्लॉवर – पाव वाटी तुकडे
- बटाटे – पाव वाटी तुकडे
- मटार – दाणे पाव वाटी
- मिरे – 10-12
- एक इंच लांबीचे दालचिनीचे तुकडे – 2-3
- जिरे – 1 टीस्पून
- शहाजिरे – 1 टीस्पून
- धणे – 1 टीस्पून
- तमालपत्र – 5-6 पाने
- लवंगा – 4-5,
- बडीशेप – 1 टीस्पून
- जायफळ – 1
- वेलदोडे – 5-6
- बेदाणा – अर्धी वाटी
- बदाम – 10-15
- काजू – 10-15
- कांदे – 2
- सायीचे दही – एक वाटी
- केशर – 1 ग्रॅम
- खाण्याचा सोडा – पाव चमचा
- कणीक – दोन वाट्या
- मावा – 200 ग्रॅम
- मीठ – चवीनुसार
- साखर – चवीनुसार
- मैदा – 2 चमचे
- आल्याचा रस – दीड चमचा
- पाणी – सात वाट्या (अंदाजे)
- तूप – एक वाटी
हेही वाचा – Recipe : ओल्या हरभऱ्याची पोळी अन् मुळ्याची पोळी
कृती
- तांदूळ एक तास आधी धुऊन ठेवावेत.
- जिरे, शहाजिरे, बडीशेप आणि धणे भाजून पूड करून ठेवावी.
- लवंगा, मिरे आणि दालचिनीचे तुकडे हे जिन्नस अर्धी चमचाभर तुपात परतून त्यांची जाडसर पूड करावी.
- भाज्यांना दोन चमचे दही आणि चिमूटभर सोडा लावून 15 मिनिटे ठेवाव्यात.
- कांदा उभा चिरून, काजू आणि बदाम (सोलून) तुपात तळून घ्यावेत.
- त्याच तुपात तमालपत्र टाकून, त्यावर तांदूळ परतावेत आणि अर्धवट भात करून घ्यावा.
- या भातावर मीठ, साखर, उरलेले दही, सोडा, आल्याचा रस आणि वरील कुटलेल्या सर्व मसाल्याच्या पूड, उरलेले मिरे हे सर्व घालून, भात सारखा करून घ्यावा.
- दुसऱ्या एका पातेल्यात दोन-तीन चमचे तूप घालून, वरील भातापैकी निम्म्या भाताचा थर घालून, त्यावर सर्व भाज्या पसराव्या.
- राहिलेल्या भातापैकी पुन्हा निम्म्या भाताचा थर पहिल्या थरावर घालून, त्यावर बेदाणा, जायफळाची भरड पूड, बदाम (सोललेले), काजू आणि तळलेला कांदा पसरावे. त्यावर राहिलेला भाताचा थर घालावा.
- नंतर उलथन्याच्या टोकाने पाच-सहा ठिकाणी तळापर्यंत भातात भोके पाडावीत. प्रत्येक भोकावर केशराच्या काड्या आणि उरलेले तूप घालावे.
- नंतर त्या पातेल्याच्या तोंडावर बरोबर बसेल, असे झाकण अथवा जाड तवा ठेवावा.
- पातेले आणि झाकण यांच्या जोडावर भिजलेली कणीक लावून सर्व बाजूंनी तोंड बंद करावे.
- नंतर ते पातेले मंद विस्तवावर ठेवून, वरही मंद निखारे ठेवून 15 मिनिटे ठेवावे.
- मावा आणि मैदा मिसळून, चांगले मळून त्याचे लहान सुपारीएवढे गोळे तयार करावेत आणि तुपात बदामी रंगावर तळून घ्यावेत.
- भात तयार झाल्यावर वाढावयाच्या वेळी भातात उभे उलथने किंवा झारा घालून पुलाव काढून घ्यावा, म्हणजे त्यातल्या भाज्या आणि मसाला यामुळे निरनिराळ्या रंगांचा भात आकर्षक दिसेल.
- हा पुलाव वाढताना त्यावर माव्याचे गोळे पसरून वाढावे.
हेही वाचा – Recipe : अशी वरी तांदळाची खिचडी करून पाहिली आहे का?
(‘रुचिरा’ पुस्तकातून साभार)
तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर,
avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा.
या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.


