Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, March 18
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home»फिल्मी»थिंक पॉझिटिव्ह
    फिल्मी

    थिंक पॉझिटिव्ह

    Team AvaantarBy Team AvaantarMarch 26, 2025Updated:March 17, 2026No Comments4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखन, मराठीआवृत्ती, मराठीसाहित्य, मराठीलेखक, मराठीमनोरंजन, मराठीवेबसाइट, मराठीआर्टिकल, मराठीस्टोरी, शोले, कर्मा, दो_आँखें_बारह_हाथ
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मनोज जोशी

    कोंबडी आधी की अंड आधी? या प्रश्नाप्रमाणेच टीव्ही चित्रपट या माध्यमांचा जनमानसावर परिणाम होतो, की समाजात घडणा-या घटना लहान-मोठ्या पडद्यावर दाखविल्या जातात? हा देखील ठोस उत्तर नसलेला प्रश्न आहे. अलीकडे काही गुन्हे टीव्हीवरील गुन्हेगारीवर आधारित मालिका पाहून घडल्याचेही समोर आले आहे. तर दुसरीकडे, प्रेमापोटी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरवर चित्रपट तयार होत आहे. पबजी गेम खेळतान सचिन मीणाशी तिचे सूत जुळले आणि ती आपल्या चार मुलांना घेऊन ती नेपाळमार्गे भारतात आल्याचे सांगण्यात येते.

    काही वर्षांपूर्वी अभिनेते विजू खोटे यांच्याशी गप्पा मारताना, सहज हा विषय छेडलला होता. पण त्यांनी याबाबत चांगलं मत मांडलं आहे. ते म्हणाले, चित्रपटाचा जनमानसावर निश्चितच परिणाम होतो, पण हेही सत्य आहे की, वास्तवात घडणाऱ्या घटनाही चित्रपटात प्रतिबिंबित होतात. पण एखाद्या पंचक्रोशी किंवा त्या राज्यापर्यंत मर्यादित असलेली घटना चित्रपटांद्वारे सर्वत्र पोहोचते. त्यांनी सांगितलेला हाच मुद्दा महत्त्वाचा आहे!

    काहीही असो, पण चित्रपटातून समाजाला काहीतरी सांगण्याचा काळ गेला आहे. प्रेक्षकांना गृहित धरलं जातं. एखादं तर्कहीन भावनिक दृश्य समोर मांडून प्रेक्षकांना गुंतवून ठेवलं जातं. मध्यंतरी एक व्हिडीओ पाहण्यात आला होता. बिग बी अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांचा तो व्हिडीओ होता. समोर प्रेक्षक आहेत आणि ते आपल्या सिनेकारकीर्दितील किस्से ते सांगत होते. ‘अमर अकबर अँथनी’ या अमर, अकबर आणि अँथनी झोपले आहेत तर, चौथ्या खाटेवर त्यांची (चित्रपटातील) आई निरुपमा रॉय आहे. या तिघांच्या हाताला जोडलेल्या नळीतून त्यांचे रक्त एका बाटलीत जाते आणि त्याच बाटलीतून निघालेली एक नळी आईच्या हाताला असते. त्यातून तिला रक्त दिले जाते… अमिताभ आणि ऋषी कपूरने दिग्दर्शक मनमोहन देसाईला सांगितले की, ‘वैज्ञानिकदृष्ट्या ते शक्य नाही. चुकीचं आहे.’ पण त्याने ऐकलं नाही. गम्मत म्हणजे, तो सीन पाहून समोरचा प्रेक्षक अधिक भावूक झाला… आणि हेच मनमोहन देसाईने इमॅजिन केलं होतं. अमिताभ बच्चन यांनी याच चित्रपटाचा दुसरा किस्सा सांगितला. ते म्हणाले, शेवटचं गाणं पाहा. आम्ही प्रत्यक्ष सांगतोय की, ‘एक जगह पर जमा हो तिनों, अमर… अकबर… अँथनी…’ तरीही त्या व्हिलन्सच्या गँगमधील एकालाही ते समजलं नाही! हे फक्त मनमोहन देसाईच करू शकतो.

    एकूणच प्रेक्षकांना तीन तास खिळवून ठेवण्याचा मसाला चित्रपटात घातला की, निर्माता-दिग्दर्शकाचे काम फत्ते. 1986मध्ये प्रदर्शित झालेला ‘कर्मा, त्याआधी 1975मधील सुपरडुपर हिट ‘शोले’ आणि 1957चा ‘दो आँखे बारह हाथ’ या तिन्ही चित्रपटांचं कथानक जवळपास सारखंच आहे. एका वाक्यात सांगायचं झालं तर, समाजाने ज्यांना नाकारलं आहे, अशा गुन्हेगारांच्या मदतीनं एक विधायक कार्य करायचं.

    त्यापैकी ‘कर्मा’ आणि ‘शोले’मध्ये गुन्हेगारांचा वापर कुख्यात गुन्हेगाराला जेरबंद करण्यासाठी केल्याचं पहायला मिळते. अगदी फिल्मी भाषेत सांगायचं झालं, ‘लोहा लोहे को काटता है’! (‘शोले’सिनेमातलाच डायलॉग) ‘कर्मा’मध्ये फाशीची शिक्षा ठोठावलेले बैजू ठाकूर (जॅकी श्रॉफ), जॉनी (अनिल कपूर) आणि खैरुद्दीन चिश्ती (नासिरुद्दीन शाह) हे तिघे, कुख्यात आंतरराष्ट्रीय अतिरेकी डॉ. डँग (अनुपम खेर) याचा खात्मा करतात. ‘शोले’तही गब्बर सिंग (अमजद खान) याला पकडण्यासाठी ‘जय’ (अमिताभ बच्चन) आणि ‘वीरू’ (धर्मेंद्र) या दोन भुरट्या चोरांची मदत घेतली जाते.

    ‘दो आँखे बारह हाथ’ या चित्रपटांत सहा सराईत गुन्हेगारांना सोबत घेऊन जेलर आदिनाथ (व्ही. शांताराम) एका पडीक जमिनीचे सोने करतो. त्यावर पिकणा-या भाजीपाल्याला बाजारात चांगली मागणी असते. इथेच हा सिनेमा इतर दोन चित्रपटांच्या तुलनेत वेगळा ठरतो. सराईत गुन्हेगार किंवा भुरटे चोर एखाद्या मोठ्या अतिरेक्याला किंवा डाकूला जेरबंद करू शकतात, हा तर्क करताच येणार नाही. अतिरेकी किंवा डाकूचा खात्मा करण्यासाठी गुन्हेगारांची मदत घ्यावी लागण्याइतपत आपले सुरक्षा दल किंवा कोणत्याही राज्यातील पोलीस दल कमकुवत तर निश्चितच नाही! पण तरीही या दोन्ही चित्रपटांनी खूप लोकप्रियता मिळवली. ‘शोले’ने तर अनेक विक्रम नोंदवले.

    त्यापेक्षा गुन्हेगारांना पुन्हा गुन्ह्याच्या मार्गावर नेण्यापेक्षा श्रमाचं महत्त्व पटवून देत त्यांना स्वत:च्या पायावर उभं करणं, हे महत्त्वाचं आहे. व्ही. शांताराम यांच्या दो आँखे बारह हाथमध्ये तेच दिसते. मॉरिस फ्रायडमॅन यांनी असा वास्तवात प्रयोग केला होता. त्यापासून प्रेरणा घेत, व्ही. शांताराम यांनी हा चित्रपपट बनवला. चित्रपटाच्या श्रेयनामावलीत नाव देऊ नका, असे मॉरिस फ्रायडमन यांनी सांगितले होते.

    ‘दो आँखे बारह हाथ’मध्ये जेलर आदिनाथ याच्या सांगण्यानुसार सहा कैदी बाजारात जाऊन ‘ना नफा, ना तोटा’या तत्त्वावर भाजीपाल्याची थेट विक्री करतात. त्यामुळे प्रत्यक्ष ग्राहकाला त्याचा फायदा होतो. बाजाराची सूत्र मूठभर व्यापाऱ्यांच्या हाती असल्याचा फटका शेतकऱ्याबरोबर ग्राहकांना बसतो, हे वास्तवही त्यात पाहायला मिळते.

    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026 फिल्मी

    माझं बालपण… गिरगाव ते बदलापूर व्हाया कॉटनग्रीन!

    March 3, 2026 फिल्मी

    एक अकेला इस शहर में…

    February 27, 2026 फिल्मी
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फिल्मी

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    By Team AvaantarMarch 16, 2026

    नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. आज माझ्या खूप लाडक्या अभिनेत्रीबद्दल सांगणार…

    माझं बालपण… गिरगाव ते बदलापूर व्हाया कॉटनग्रीन!

    March 3, 2026

    एक अकेला इस शहर में…

    February 27, 2026

    Flirting… काही असेही अनुभव!

    February 24, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : बालगटातील विज्ञान शिक्षण

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 240
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 499
    • वास्तू आणि वेध 353
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn