Author: वैद्य विष्णू देविदास सावंत

आपण पाहिले की, वसंत ऋतूत शरीरातील ‘कफ’ वितळून पचनशक्ती मंदावते आणि सर्दी-खोकल्यासारखे आजार वाढतात. या कफाला नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच पचन सुधारण्यासाठी आपला आहार कसा असावा, हे आज आपण पाहणार आहोत. आयुर्वेदानुसार, वसंत ऋतूत आहार पचायला हलका (लघु), कोरडा (रूक्ष) आणि उष्ण असावा. तसेच, कडू, तिखट आणि तुरट चवीच्या पदार्थांचा आहारात समावेश वाढवावा. वसंत ऋतूत हे नक्की खा धान्य (Grains) : नवीन धान्य पचायला जड आणि कफ वाढवणारे असते. त्यामुळे या दिवसांत एक वर्ष जुने धान्य वापरावे. गहू आणि तांदळापेक्षा ज्वारी, बाजरी आणि बार्ली (यव) यांचा वापर भाकरीसाठी जास्तीत जास्त करावा. कडधान्ये आणि डाळी : मुगाची डाळ ही पचायला सर्वात हलकी…

Read More